सीटीईटी परीक्षेचा निकाल जाहीर
खाली लिंक वर आपण निकाल पाहू शकता
google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0
मराठी भाषा सर्व इयत्तांच्या पायाभूत चाचणीच्या उत्तरपत्रिका
खालील इयत्ताना स्पर्श करून डाऊनलोड करू शकता.
मराठी उत्तरसूची
पायाभूत चाचणी
जुलै 2024 च्या इयत्तानिहाय, माध्यमनिहाय व विषयनिहाय शिक्षक सूचना व उत्तरसूची परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिलेबाबत*.
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळा यांमधील इ ३ री ते ९वी या वर्गातील विद्यार्थांची प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या विषयांसाठीची पायाभूत चाचणी दि १० ते १२ जुलै २०२४ या कालावधित होणार आहे . सदर चाचणी साठीच्या प्रश्नपत्रिका शाळास्तरांपर्यंत पोहोच झालेल्या आहेत . शिक्षक सूचना व उत्तरसूची या परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. संकेतस्थळावरील किंवा सोबत दिलेल्या लिंकवर जावून आपण शिक्षक सूचना व उत्तरसूची डाऊनलोड करून घेऊ शकता .याची माहिती आपले स्तरावरून आपल्या अधिनस्थ शाळांपर्यंत व शिक्षकांपर्यंत देण्यात यावी .
शिक्षकसूचना लगेच पाहता येतील मात्र उत्तरसूची या परीक्षा नियोजनाप्रमाणे १० जुलै रोजी प्रथम भाषा, ११ जुलै रोजी गणित आणि १२ जुलै रोजी तृतीय भाषा या विषयाप्रमाणे त्याच दिवशी सायंकाळी ५.०० वाजल्यानंतर प्रसिद्ध केल्या जातील .
शिक्षक सूचना पाहण्यासाठी लिंक 👉 https://drive.google.com/drive/folders/1AFsJ0symVCz8kg4iq-cmnCKLzO8wIJ_R?usp=drive_link
( राहूल रेखावार, भाप्रसे)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
महाराष्ट्र राज्य विधानपरिषद निवडणूक
मुंबई पदवीधर मतदारसंघ, कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या विधानपरिषद निवडणुकांसाठी मतदार यादी जाहीर.
मतदार यादीतील आपले नाव शोधण्यासाठी येथे क्लिक करा.
इयता १० वी चा निकाल आपण खालील लिंकला क्लिक करून बघू शकता .
निकाल पाहण्यासाठी आपला सीट नं. आणि आईचे नाव टाकणे.
निकाल दुपारी १ वाजेनंतर जाहीर होणार आहे.
भागोजी नाईक आदिवासी भिल्ल समाजात जन्म व बालपण :
भागोजी नाईक यांचा जन्म १८०४ साली एका भिल्ल आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे जन्म गाव नांदूरशिंगोटे होय. सिन्नर पासून पूर्वेला पुणे हायवेला लागून नांदूरशिंगोटे गाव आहे. या गावात मराठा समाज, भिल्ल समाज, महादेव कोळी समाज, नवबौद्ध समाज, अशा विविध जाती जमातीचे लोक गुण्यागोविंदाने राहत होते व अद्यापि राहत आहे. भागोजी नाईकांना 'महिपती' नावाचा पाठचा भाऊ तर 'बायजाबाई' नावाची बहिण होती. तसेच 'यशवंत आणि गुलाब' नावाची दोन मुले होती. अशावेळी घरात आई वडील धरून जवळ जवळ सहा माणसे होती. उदरनिर्वाहासाठी गावातील शेतकऱ्यांच्या शेतात मजुरी करणे हाच काय तो त्यांच्या चरितार्थाचा मार्ग होता. शिवाय आदिवासी म्हटलं म्हणजे हमखास त्याच्या दारात दोन चार शेळ्या, कोंबड्या, एखादी म्हैस, तिची पारडी असायची. भागोजीच्या घरात देखील शेळ्या होत्या. दिवस उगवला म्हणजे सृष्टीला जाग येते. तो सूर्य कुणाचा भेदभाव न करता सर्वांना प्रकाश देतो. समस्त सृष्टी त्यांच्या आगमनाने प्रफुल्लित होते. समस्त प्राणी जगताला भारून टाकते. तसेच काहीसा भागोजी नायकाचा तळपता सूर्य कोवळ्या प्रकाशाप्रमाणे दिवसागणिक वाढत होता. त्यास समाजाच्या वेदनांची, दुःखाची जाणिवपूर्वक संवेदना होत होती. त्याच्या आईने कानात घातलेल्या बाळ्या त्यास अधिक शोभून दिसत होत्या. जणू काही भविष्यकालिन कार्यकर्तृत्वाचा भास त्या बाळ्या दर्शवित होत्या.
आईवडील काबाडकष्ट करीत होते. शेतात मोलमजुरी करणे आणि शेतात शेळ्या चारून, त्यात शेळ्यांनी दिलेले बोकड मोठे झाल्यावर सिन्नरच्या बाजारात विकून आलेल्या पैशाआडक्यात संसाराचा गाडा चालविणे हे चित्र समस्त आदिवासी बांधवांच्या घरी हमखास पहावयास मिळते. मात्र शेळ्या रानात चारण्याठी नेणे, त्यांचे संगोपन करणे, कोल्हे, कुत्रे, तरस, बिबट्या, वाघ यापासून पासून रक्षण करणे ही जोखमीची कामे भागोजीलाच पार पाडावी लागत असत. शेळ्या चारण्यासाठी नांदूर शिंगोट्याच्या दक्षिणेला असलेल्या चासखिंडीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे, झुडुपे, गवत असल्याने शेळ्यांना भरपूर चारा उपलब्ध होई. त्यामुळे कुणा शेतकऱ्यााच्या मळ्याथळ्यात, उभ्या पिकात शेळ्या नेऊन चारण्याचा विषयच नव्हता. चासखिंडीतील निसर्ग वैभवाने माणसाला आणि मुक्या प्राण्यांना मोठ्या प्रमाणात अन्नपाण्याची शिदोरीच दिली होती. सकाळी सकाळी भागोजी नाईक आणि त्यांचे सोबती खांद्यावर कुन्हाडी, विळे, कोयते घेऊन नेहमी शेळ्या चारण्यासाठी चासखिंडीमध्ये जात असत. दुपारी न्याहारीला फडक्यात बांधलेल्या बाजरीची नाहीतर ज्वारीची भाकरी आणि त्यावर लाल, हिरव्या मिरचीचा गोळा म्हणजे त्यांचे कोड्यास होय. रानात फिरत असतांना बाळद्यांना (शेळ्या जनावरे व त्यांची राखण आणि सांभाळ करणाऱ्या मुलांना गुराखी म्हणजेच बाळदी म्हणतात) व्हलगा, पान कोंबडी, लावरी, गांज्या, घोरपड, सरड्या, कोल्हा, तरस, वाघ, बिबट्या, साप अशा विविध प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, आणि जंगली श्वापदे यांची त्यांना ओळख होती. रोजच या प्रणाण्यांशी त्यांची गाठ पडत असल्याने जणूकाही त्यांचे ते सोबतीच होते. जोपर्यंत वन्यप्राणी आपल्याला त्रास देत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर हात उगारायचा नाही हे तत्त्व बाळदी पाळत होते. जोपर्यंत अंगाशी येत नाही तोपर्यंत कुणालाही दगाफटका करायचा नाही अशा जाणिवेने ही आदिवासी मुले आणि एकूणच आदिवासी समाज जगत आला आहे आणि तो असाच जगत राहणार आहे.
भागोजी आता तरणाबांड झाला होता. घरात पाठची बहिण बायजाबाई होती. भाऊ महिपती मात्र आईवडिलांबरोबर लोकांच्या शेतात मजुरी करण्यासाठी जात असे. त्या काळात (इ.स. १८०० ते १९०० च्या कालखंडात) शेतात राबणाऱ्या मजुराला धान्याच्या स्वरूपात मजुरी मिळत असे. क्वचित प्रसंगी चारआठ आणे अशी रोख स्वरुपात मिळत असे. शिवाय कामाची विभागणी आलेली असायची. बायजा बाईने घरातील सारवणे, पाणी आणणे, जमल्यास भाकरी करून ठेवणे, भागोजीने शेळ्या वळणे ( राखणे) चारापाणी करणे.