सीटीईटी परीक्षेचा निकाल जाहीर
खाली लिंक वर आपण निकाल पाहू शकता
google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0
मराठी भाषा सर्व इयत्तांच्या पायाभूत चाचणीच्या उत्तरपत्रिका
खालील इयत्ताना स्पर्श करून डाऊनलोड करू शकता.
मराठी उत्तरसूची
पायाभूत चाचणी
जुलै 2024 च्या इयत्तानिहाय, माध्यमनिहाय व विषयनिहाय शिक्षक सूचना व उत्तरसूची परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिलेबाबत*.
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळा यांमधील इ ३ री ते ९वी या वर्गातील विद्यार्थांची प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या विषयांसाठीची पायाभूत चाचणी दि १० ते १२ जुलै २०२४ या कालावधित होणार आहे . सदर चाचणी साठीच्या प्रश्नपत्रिका शाळास्तरांपर्यंत पोहोच झालेल्या आहेत . शिक्षक सूचना व उत्तरसूची या परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. संकेतस्थळावरील किंवा सोबत दिलेल्या लिंकवर जावून आपण शिक्षक सूचना व उत्तरसूची डाऊनलोड करून घेऊ शकता .याची माहिती आपले स्तरावरून आपल्या अधिनस्थ शाळांपर्यंत व शिक्षकांपर्यंत देण्यात यावी .
शिक्षकसूचना लगेच पाहता येतील मात्र उत्तरसूची या परीक्षा नियोजनाप्रमाणे १० जुलै रोजी प्रथम भाषा, ११ जुलै रोजी गणित आणि १२ जुलै रोजी तृतीय भाषा या विषयाप्रमाणे त्याच दिवशी सायंकाळी ५.०० वाजल्यानंतर प्रसिद्ध केल्या जातील .
शिक्षक सूचना पाहण्यासाठी लिंक 👉 https://drive.google.com/drive/folders/1AFsJ0symVCz8kg4iq-cmnCKLzO8wIJ_R?usp=drive_link
( राहूल रेखावार, भाप्रसे)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
महाराष्ट्र राज्य विधानपरिषद निवडणूक
मुंबई पदवीधर मतदारसंघ, कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या विधानपरिषद निवडणुकांसाठी मतदार यादी जाहीर.
मतदार यादीतील आपले नाव शोधण्यासाठी येथे क्लिक करा.
इयता १० वी चा निकाल आपण खालील लिंकला क्लिक करून बघू शकता .
निकाल पाहण्यासाठी आपला सीट नं. आणि आईचे नाव टाकणे.
निकाल दुपारी १ वाजेनंतर जाहीर होणार आहे.
भागोजी नाईक आदिवासी भिल्ल समाजात जन्म व बालपण :
भागोजी नाईक यांचा जन्म १८०४ साली एका भिल्ल आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे जन्म गाव नांदूरशिंगोटे होय. सिन्नर पासून पूर्वेला पुणे हायवेला लागून नांदूरशिंगोटे गाव आहे. या गावात मराठा समाज, भिल्ल समाज, महादेव कोळी समाज, नवबौद्ध समाज, अशा विविध जाती जमातीचे लोक गुण्यागोविंदाने राहत होते व अद्यापि राहत आहे. भागोजी नाईकांना 'महिपती' नावाचा पाठचा भाऊ तर 'बायजाबाई' नावाची बहिण होती. तसेच 'यशवंत आणि गुलाब' नावाची दोन मुले होती. अशावेळी घरात आई वडील धरून जवळ जवळ सहा माणसे होती. उदरनिर्वाहासाठी गावातील शेतकऱ्यांच्या शेतात मजुरी करणे हाच काय तो त्यांच्या चरितार्थाचा मार्ग होता. शिवाय आदिवासी म्हटलं म्हणजे हमखास त्याच्या दारात दोन चार शेळ्या, कोंबड्या, एखादी म्हैस, तिची पारडी असायची. भागोजीच्या घरात देखील शेळ्या होत्या. दिवस उगवला म्हणजे सृष्टीला जाग येते. तो सूर्य कुणाचा भेदभाव न करता सर्वांना प्रकाश देतो. समस्त सृष्टी त्यांच्या आगमनाने प्रफुल्लित होते. समस्त प्राणी जगताला भारून टाकते. तसेच काहीसा भागोजी नायकाचा तळपता सूर्य कोवळ्या प्रकाशाप्रमाणे दिवसागणिक वाढत होता. त्यास समाजाच्या वेदनांची, दुःखाची जाणिवपूर्वक संवेदना होत होती. त्याच्या आईने कानात घातलेल्या बाळ्या त्यास अधिक शोभून दिसत होत्या. जणू काही भविष्यकालिन कार्यकर्तृत्वाचा भास त्या बाळ्या दर्शवित होत्या.
आईवडील काबाडकष्ट करीत होते. शेतात मोलमजुरी करणे आणि शेतात शेळ्या चारून, त्यात शेळ्यांनी दिलेले बोकड मोठे झाल्यावर सिन्नरच्या बाजारात विकून आलेल्या पैशाआडक्यात संसाराचा गाडा चालविणे हे चित्र समस्त आदिवासी बांधवांच्या घरी हमखास पहावयास मिळते. मात्र शेळ्या रानात चारण्याठी नेणे, त्यांचे संगोपन करणे, कोल्हे, कुत्रे, तरस, बिबट्या, वाघ यापासून पासून रक्षण करणे ही जोखमीची कामे भागोजीलाच पार पाडावी लागत असत. शेळ्या चारण्यासाठी नांदूर शिंगोट्याच्या दक्षिणेला असलेल्या चासखिंडीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे, झुडुपे, गवत असल्याने शेळ्यांना भरपूर चारा उपलब्ध होई. त्यामुळे कुणा शेतकऱ्यााच्या मळ्याथळ्यात, उभ्या पिकात शेळ्या नेऊन चारण्याचा विषयच नव्हता. चासखिंडीतील निसर्ग वैभवाने माणसाला आणि मुक्या प्राण्यांना मोठ्या प्रमाणात अन्नपाण्याची शिदोरीच दिली होती. सकाळी सकाळी भागोजी नाईक आणि त्यांचे सोबती खांद्यावर कुन्हाडी, विळे, कोयते घेऊन नेहमी शेळ्या चारण्यासाठी चासखिंडीमध्ये जात असत. दुपारी न्याहारीला फडक्यात बांधलेल्या बाजरीची नाहीतर ज्वारीची भाकरी आणि त्यावर लाल, हिरव्या मिरचीचा गोळा म्हणजे त्यांचे कोड्यास होय. रानात फिरत असतांना बाळद्यांना (शेळ्या जनावरे व त्यांची राखण आणि सांभाळ करणाऱ्या मुलांना गुराखी म्हणजेच बाळदी म्हणतात) व्हलगा, पान कोंबडी, लावरी, गांज्या, घोरपड, सरड्या, कोल्हा, तरस, वाघ, बिबट्या, साप अशा विविध प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, आणि जंगली श्वापदे यांची त्यांना ओळख होती. रोजच या प्रणाण्यांशी त्यांची गाठ पडत असल्याने जणूकाही त्यांचे ते सोबतीच होते. जोपर्यंत वन्यप्राणी आपल्याला त्रास देत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर हात उगारायचा नाही हे तत्त्व बाळदी पाळत होते. जोपर्यंत अंगाशी येत नाही तोपर्यंत कुणालाही दगाफटका करायचा नाही अशा जाणिवेने ही आदिवासी मुले आणि एकूणच आदिवासी समाज जगत आला आहे आणि तो असाच जगत राहणार आहे.
भागोजी आता तरणाबांड झाला होता. घरात पाठची बहिण बायजाबाई होती. भाऊ महिपती मात्र आईवडिलांबरोबर लोकांच्या शेतात मजुरी करण्यासाठी जात असे. त्या काळात (इ.स. १८०० ते १९०० च्या कालखंडात) शेतात राबणाऱ्या मजुराला धान्याच्या स्वरूपात मजुरी मिळत असे. क्वचित प्रसंगी चारआठ आणे अशी रोख स्वरुपात मिळत असे. शिवाय कामाची विभागणी आलेली असायची. बायजा बाईने घरातील सारवणे, पाणी आणणे, जमल्यास भाकरी करून ठेवणे, भागोजीने शेळ्या वळणे ( राखणे) चारापाणी करणे.
नवीन प्रवेश ।। नवीन प्रवेश ।।
के आर टी हायस्कूल वणी या विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीच्या नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देणे चालू आहे,
इयत्ता पाचवी ते दहावी सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाला प्रवेश देणे सुरू आहे
शाळेच्या अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा.
सूर्यग्रहण म्हणजे जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये येतो, तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहणाबद्दल खूप पूर्वीपासून नोंदी ठेवलेल्या आहेत.
सूर्यग्रहण हे अमावस्येच्या दिवशीच दिसते. पण सर्व अमावस्यांना सूर्यग्रहण दिसत नाही. कारण सर्व अमावस्यांना पृथ्वीची कक्षा आणि चंद्राची कक्षा एका रेषेत येत नाहीत. पण जेव्हा अमावस्येकडे पृथ्वीची कक्षा आणि चंद्राची कक्षा एका रेषेत येतात तेव्हाच सूर्यग्रहण होते.
सूर्यग्रहणाचे तीन मुख्य प्रकार आहेत:-
सूर्यग्रहण हा उघड्या म्हणजेच साध्या डोळांनी पाहणे खूप धोकादायक आहे. त्यामुळे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सूर्यग्रहण पाहण्यासाठी खास तयार केलेले फिल्टर असलेले चष्मे (eclipse glasses) वापरावेत. एवढेच नाही तर वेल्डिंग शेड नंबर 14 चे ग्लासेस (welding shade 14 glasses) देखील सूर्यग्रहण पाहण्यासाठी वापरता येतात.
जागतिक ग्राहक हक्क दिन दरवर्षी १५ मार्च रोजी साजरा केला जातो.
हा दिवस ग्राहक हक्क आणि गरजांबद्दल जागतिक जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे. सर्व ग्राहकांच्या हक्कांचा आदर आणि संरक्षण केले जावे, अशी मागणी करण्याची आणि बाजारपेठेतील अन्यायकारक प्रथांच्या विरोधात लढण्याची ही संधी आहे.
जागतिक ग्राहक हक्क दिन 2024 ची थीम "ग्राहकांसाठी योग्य आणि जबाबदार AI" आहे. ही थीम आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे आपल्या जीवनातील वाढते महत्त्व आणि AI चा विकास आणि वापर ग्राहकांसाठी योग्य आणि फायदेशीर असेल याची खात्री करण्याची गरज यावर प्रकाश टाकते.
जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त प्रोत्साहन दिलेले काही प्रमुख ग्राहक हक्क येथे आहेत:
* सुरक्षेचा अधिकार: ग्राहकांना त्यांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी हानिकारक उत्पादने आणि सेवांपासून संरक्षित करण्याचा अधिकार आहे.
* निवडण्याचा अधिकार: ग्राहकांना स्पर्धात्मक किमतींमध्ये विविध उत्पादने आणि सेवांमधून निवड करण्याचा अधिकार आहे.
* माहिती मिळण्याचा अधिकार: ग्राहकांना त्यांनी खरेदी केलेली उत्पादने आणि सेवांबद्दल अचूक आणि स्पष्ट माहिती मिळवण्याचा अधिकार आहे.
* ऐकण्याचा अधिकार: ग्राहकांना अयोग्य किंवा दिशाभूल करणाऱ्या पद्धतींबद्दल तक्रार करण्याचा आणि त्यांच्या तक्रारींचे न्याय्यपणे निराकरण करण्याचा अधिकार आहे.
* निवारण करण्याचा अधिकार: ग्राहकांना सदोष उत्पादने किंवा सेवांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मागण्याचा अधिकार आहे.
जागतिक ग्राहक हक्क दिन हा ग्राहकांच्या हक्कांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि निष्पक्ष आणि जबाबदार व्यवसाय पद्धतींना चालना देण्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे.
केंद्र क्रमांक ११७०, के. आर. टी वणी साठी एसएससी परीक्षा २०२४ची आसन व्यवस्था आज जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाऊन आपला आसन क्रमांक पाहू शकतात.
केंद्र संचालक श्री शिंदे बी. व्ही. यांनी यावर्षीही एसएससी परीक्षा ही कॉपीमुक्त होणार आहे, असे सर्व पर्यवेक्षकीय सहविचार सभेत मार्गदर्शन करताना सांगितले. .
विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना:
!! एसएससी परीक्षा २०२४ साठी शुभेच्छा !!
"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या उपक्रमांतर्गत शासकीय तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या अनेक शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे। राज्यातील जवळपास एक लाखाच्या वरती शाळांनी आपला सहभाग नोंदविला असून, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपांतर्गत माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या संदेश पत्रामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकण्याचा व सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार, चांगल्या प्रतीचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे असा या उपक्रमाचा उद्देश आहे.
महावाचन उत्सव उपक्रमामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांतून आपल्याला मिळालेली प्रेरणा किंवा शिकवण नेहमीच प्रेरणादायी ठरत असते.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील असेच काही महत्त्वाच्या प्रसंगांवर या ठिकाणी एक प्रश्नावली तयार करण्यात आलेली आहे. आपण ही प्रश्नावली सोडविण्याचा प्रयत्न करूया.
प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिलेले आहेत . यातील योग्य तो पर्याय निवडणे. जर आपल्याला 60% च्या पुढे गुण मिळाले, तर तुम्हाला एक छानसे प्रमाणपत्र तुमच्या E- MAIL वर मिळेल. तुम्ही ते प्रिंट करून घेवू शकता. दररोज फक्त 60 प्रमाणपत्रे वाटप केली जातील. पुढील प्रमाणपत्रे दुसऱ्या दिवशी आपल्या E-MAIL वर पाठवली जातील.
आपण ही प्रश्नावली कितीही वेळा सोडवू शकता.
खालील लिंकला क्लिक करून आपण ही प्रश्नावली सोडवू या.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा
याचे forms आपण खालीलप्रमाणे Download करून पाहू शकता . आवश्यक ती माहिती अगोदर तयार करून नंतर 2 MB पर्यंत आपले फोटो ( २ किंवा ३ ) PDF स्वरुपात तयार करून नंतर Upload करावे. केलेली माहिती आपण सेव Save करून ठेवा . याप्रमाणे आपण आपला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम पूर्ण करून नंतर तो Finalise करावा.
माझी शाळा सुंदर शाळा चे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणेबाबत...
सुंदर शाळा हा उपक्रम दिनांक 1 जानेवारी 2024 पासून ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत 45 दिवस हा उपक्रम राबवला जाणार आहे या अंतर्गत या शाळांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन education .maharashtra.gov.in या वर जावून स्कूल पोर्टल मधून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यावर जाऊन शाळेचे रजिस्ट्रेशन सर्व शाळांनी करावयाचे आहे. यासंदर्भात सोबत व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ बघून त्यानुसार आपल्या शाळेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावयाचा आहे. तसेच हे रजिस्ट्रेशन करताना एक जानेवारीपासून तर आज पावतो आपण जे उपक्रम राबविले आहेत त्या उपक्रमांची मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या मध्ये आपण राबवलेल्या उपक्रमांची माहिती नोंदवायची आहे व पीडीएफ स्वरूपात फोटो अपलोड करावयाचे आहेत तरी सर्व शाळांनी याबाबत कार्यवाही करावी परंतु हा 45 दिवसाचा उपक्रम असल्यामुळे फायनल सबमिट करू नये. 45 दिवसाचे आपल्याला दर आठवड्याला किंवा दररोज याची ऑनलाईन माहिती भरावयाची आहे. व उपक्रम संपल्यानंतर फायनल सबमिट करावयाचे आहे. आपण जर आजच फायनल सबमिट केले, तर सदर याच्यावर आपल्याला माहिती भरता येणार नाही.
तरी सर्वांनी याची काळजी घ्यावी आणि हा उपक्रम माननीय मुख्यमंत्री यांचा असल्याकारणाने याचा दर आठवड्याला आढावा घेतला जाणार आहे, त्यामुळे या उपक्रमाच्या संदर्भात जो शासन निर्णय आहे. त्या शासन निर्णयाप्रमाणे शाळा स्तरावर 45 दिवस उपक्रम राबवून ऑनलाइन त्याची दर आठवड्याला नोंदणी करावयाची आहे. आपण दर गुरुवारी आपल्याला अहवाल द्यायचा असल्याने आपण आठवडाभरातले सर्व उपक्रम गुरुवारपर्यंत नोंदवायचे आहेत, तर या सूचनेची सर्वांनी नोंद घ्यावी.
या उपक्रमा संदर्भात विविध अधिकारीभेटी देऊन पाहणी होणार आहे तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांना याबाबत माहिती आहे का हे तपासणार आहेत.सर्व मुख्याध्यापक यांनी याबाबत च्या शासन निर्णयाचे प्रिंट काढून त्याचे शिक्षक सभा घेऊन वाचन करून घ्यावे व त्यावर सर्व शिक्षकांची स्वाक्षरी घ्यावी.
तसेच या उपक्रमात शाळांना रँकिंग देऊन शाळांना पारितोषिक देखील दिले जाणार आहे. तरी या उपक्रमाची अंमलबजावणी सर्वांनी नियमित करावी. उद्यापासून शाळचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यास सुरुवात करावी .आपण रजिस्ट्रेशन केले की नाही हे BEO लॉगिन वर दिसणार आहे.
**********
खालील व्हिडिओ पाहून आपण शाळा रजिस्ट्रेशन करू शकता ..
प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी आणि जीवनात यश मिळवण्यासाठी उत्तम शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच आपले व्यक्तिमत्व घडवण्यासही मदत होते. शालेय शिक्षण प्रत्येकाच्या जीवनात मोठी भूमिका बजावते. संपूर्ण शिक्षण प्रणाली प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण अशा तीन भागांमध्ये विभागली गेली आहे. शिक्षणाच्या सर्व स्तरांना स्वतःचे विशेष महत्त्व आणि स्थान आहे. आपल्या मुलांना यशाच्या दिशेने जाताना आपल्या सर्वांना पहायचे आहे, जे केवळ चांगल्या आणि योग्य शिक्षणानेच शक्य आहे.
आजच्या समाजात शिक्षणाचे महत्त्व खूप वाढले आहे. शिक्षणाचे उपयोग अनेक आहेत पण त्याला नवी दिशा देण्याची गरज आहे. शिक्षण असे असले पाहिजे की माणसाला त्याच्या वातावरणाची ओळख होईल. आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हे अत्यंत आवश्यक साधन आहे. शिक्षणाच्या या साधनाचा उपयोग करून आपण आपल्या जीवनात काहीही चांगले साध्य करू शकतो.
उच्च पातळीचे शिक्षण लोकांना सामाजिक आणि कौटुंबिक आदर आणि एक वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत करते. शिक्षणाचा काळ हा प्रत्येकासाठी सामाजिक आणि वैयक्तिकरित्या खूप महत्त्वाचा काळ असतो, यामुळेच आपल्या जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व आहे.