google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: 2024
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Wednesday 31 July 2024

सीटीईटी परीक्षेचा निकाल 2024

 सीटीईटी परीक्षेचा निकाल जाहीर  

 खाली लिंक वर आपण निकाल पाहू शकता 

https://ctet.nic.in/

Thursday 11 July 2024

पायाभूत चाचणी 2024-25

 मराठी भाषा सर्व इयत्तांच्या पायाभूत चाचणीच्या  उत्तरपत्रिका

खालील इयत्ताना स्पर्श करून  डाऊनलोड करू शकता.

मराठी उत्तरसूची 

१) मराठी इ. ३ री .                    गणित उत्तरसूची 


३) मराठी इ. ५ वी                        2)  इ. 4 थी  




इंग्रजी  उत्तरसूची 









Wednesday 10 July 2024

पायाभूत चाचणी

पायाभूत चाचणी

  जुलै 2024 च्या इयत्तानिहाय, माध्यमनिहाय व विषयनिहाय शिक्षक सूचना व उत्तरसूची परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिलेबाबत*.


 उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था  व  खाजगी अनुदानित शाळा यांमधील इ ३  री ते ९वी या वर्गातील विद्यार्थांची प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या विषयांसाठीची पायाभूत चाचणी  दि १० ते १२ जुलै २०२४ या कालावधित होणार आहे . सदर चाचणी साठीच्या प्रश्नपत्रिका शाळास्तरांपर्यंत पोहोच झालेल्या आहेत . शिक्षक सूचना व उत्तरसूची या परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या  आहेत. संकेतस्थळावरील किंवा सोबत दिलेल्या लिंकवर जावून आपण शिक्षक सूचना व उत्तरसूची डाऊनलोड करून घेऊ शकता .याची माहिती आपले स्तरावरून आपल्या अधिनस्थ शाळांपर्यंत व शिक्षकांपर्यंत देण्यात यावी .

        शिक्षकसूचना लगेच पाहता येतील मात्र उत्तरसूची या परीक्षा नियोजनाप्रमाणे १० जुलै रोजी प्रथम भाषा, ११ जुलै रोजी गणित आणि १२ जुलै रोजी तृतीय भाषा या विषयाप्रमाणे त्याच दिवशी सायंकाळी ५.०० वाजल्यानंतर  प्रसिद्ध केल्या जातील . 


शिक्षक सूचना पाहण्यासाठी लिंक 👉 https://drive.google.com/drive/folders/1AFsJ0symVCz8kg4iq-cmnCKLzO8wIJ_R?usp=drive_link


         ( राहूल रेखावार, भाप्रसे)

                  संचालक

       राज्य शैक्षणिक संशोधन व     

    प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Sunday 16 June 2024

शिक्षक पदवीधर मतदारसंघ

 महाराष्ट्र राज्य विधानपरिषद निवडणूक 

मुंबई पदवीधर मतदारसंघ, कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या विधानपरिषद निवडणुकांसाठी मतदार यादी जाहीर.

मतदार यादीतील आपले नाव शोधण्यासाठी येथे क्लिक करा.


            Click Here

Monday 27 May 2024

SSC Result 2024

 इयता १० वी चा निकाल आपण खालील लिंकला क्लिक करून बघू शकता .

निकाल पाहण्यासाठी आपला सीट नं. आणि आईचे नाव टाकणे.

निकाल दुपारी १ वाजेनंतर जाहीर होणार आहे.

१)  SSC Result 2024

२)  SSC Result 2024

३)  SSC Result 2024

४)  SSC Result 2024


Tuesday 7 May 2024

भागोजी नाईक आदिवासी भिल्ल समाजात जन्म

  

भागोजी नाईक आदिवासी भिल्ल समाजात जन्म व बालपण :




भागोजी नाईक यांचा जन्म १८०४ साली एका भिल्ल आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे जन्म गाव नांदूरशिंगोटे होय. सिन्नर पासून पूर्वेला पुणे हायवेला लागून नांदूरशिंगोटे गाव आहे. या गावात मराठा समाज, भिल्ल समाज, महादेव कोळी समाज, नवबौद्ध समाज, अशा विविध जाती जमातीचे लोक गुण्यागोविंदाने राहत होते व अद्यापि राहत आहे. भागोजी नाईकांना 'महिपती' नावाचा पाठचा भाऊ तर 'बायजाबाई' नावाची बहिण होती. तसेच 'यशवंत आणि गुलाब' नावाची दोन मुले होती. अशावेळी घरात आई वडील धरून जवळ जवळ सहा माणसे होती. उदरनिर्वाहासाठी गावातील शेतकऱ्यांच्या शेतात मजुरी करणे हाच काय तो त्यांच्या चरितार्थाचा मार्ग होता. शिवाय आदिवासी म्हटलं म्हणजे हमखास त्याच्या दारात दोन चार शेळ्या, कोंबड्या, एखादी म्हैस, तिची पारडी असायची. भागोजीच्या घरात देखील शेळ्या होत्या. दिवस उगवला म्हणजे सृष्टीला जाग येते. तो सूर्य कुणाचा भेदभाव न करता सर्वांना प्रकाश देतो. समस्त सृष्टी त्यांच्या आगमनाने प्रफुल्लित होते. समस्त प्राणी जगताला भारून टाकते. तसेच काहीसा भागोजी नायकाचा तळपता सूर्य कोवळ्या प्रकाशाप्रमाणे दिवसागणिक वाढत होता. त्यास समाजाच्या वेदनांची, दुःखाची जाणिवपूर्वक संवेदना होत होती. त्याच्या आईने कानात घातलेल्या बाळ्या त्यास अधिक शोभून दिसत होत्या. जणू काही भविष्यकालिन कार्यकर्तृत्वाचा भास त्या बाळ्या दर्शवित होत्या.

आईवडील काबाडकष्ट करीत होते. शेतात मोलमजुरी करणे आणि शेतात शेळ्या चारून, त्यात शेळ्यांनी दिलेले बोकड मोठे झाल्यावर सिन्नरच्या बाजारात विकून आलेल्या पैशाआडक्यात संसाराचा गाडा चालविणे हे चित्र समस्त आदिवासी बांधवांच्या घरी हमखास पहावयास मिळते. मात्र शेळ्या रानात चारण्याठी नेणे, त्यांचे संगोपन करणे, कोल्हे, कुत्रे, तरस, बिबट्या, वाघ यापासून पासून रक्षण करणे ही जोखमीची कामे भागोजीलाच पार पाडावी लागत असत. शेळ्या चारण्यासाठी नांदूर शिंगोट्‌याच्या दक्षिणेला असलेल्या चासखिंडीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे, झुडुपे, गवत असल्याने शेळ्यांना भरपूर चारा उपलब्ध होई. त्यामुळे कुणा शेतकऱ्यााच्या मळ्याथळ्यात, उभ्या पिकात शेळ्या नेऊन चारण्याचा विषयच नव्हता. चासखिंडीतील निसर्ग वैभवाने माणसाला आणि मुक्या प्राण्यांना मोठ्या प्रमाणात अन्नपाण्याची शिदोरीच दिली होती. सकाळी सकाळी भागोजी नाईक आणि त्यांचे सोबती खांद्यावर कुन्हाडी, विळे, कोयते घेऊन नेहमी शेळ्या चारण्यासाठी चासखिंडीमध्ये जात असत. दुपारी न्याहारीला फडक्यात बांधलेल्या बाजरीची नाहीतर ज्वारीची भाकरी आणि त्यावर लाल, हिरव्या मिरचीचा गोळा म्हणजे त्यांचे कोड्‌यास होय. रानात फिरत असतांना बाळद्यांना (शेळ्या जनावरे व त्यांची राखण आणि सांभाळ करणाऱ्या मुलांना गुराखी म्हणजेच बाळदी म्हणतात) व्हलगा, पान कोंबडी, लावरी, गांज्या, घोरपड, सरड्या, कोल्हा, तरस, वाघ, बिबट्या, साप अशा विविध प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, आणि जंगली श्वापदे यांची त्यांना ओळख होती. रोजच या प्रणाण्यांशी त्यांची गाठ पडत असल्याने जणूकाही त्यांचे ते सोबतीच होते. जोपर्यंत वन्यप्राणी आपल्याला त्रास देत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर हात उगारायचा नाही हे तत्त्व बाळदी पाळत होते. जोपर्यंत अंगाशी येत नाही तोपर्यंत कुणालाही दगाफटका करायचा नाही अशा जाणिवेने ही आदिवासी मुले आणि एकूणच आदिवासी समाज जगत आला आहे आणि तो असाच जगत राहणार आहे.


भागोजी आता तरणाबांड झाला होता. घरात पाठची बहिण बायजाबाई होती. भाऊ महिपती मात्र आईवडिलांबरोबर लोकांच्या शेतात मजुरी करण्यासाठी जात असे. त्या काळात (इ.स. १८०० ते १९०० च्या कालखंडात) शेतात राबणाऱ्या मजुराला धान्याच्या स्वरूपात मजुरी मिळत असे. क्वचित प्रसंगी चारआठ आणे अशी रोख स्वरुपात मिळत असे. शिवाय कामाची विभागणी आलेली असायची. बायजा बाईने घरातील सारवणे, पाणी आणणे, जमल्यास भाकरी करून ठेवणे, भागोजीने शेळ्या वळणे ( राखणे) चारापाणी करणे.

महिपतीने आईवडीलांसोबत शेतात मजुरीस जाणे, अशा प्रकारे भागोजी नाईकांच्या कौटुंबिक चरितार्थाचा दिनक्रम होता. तसे पहिले तर एकूणच सर्व आदिवासी समाजात हे चित्र पहायला

मिळते. दररोज मोलमजुरी करून कष्टप्रद जीवन व्यतित करणारा हा समाज मोठे मूल्यांत्मक जीवन जगत आहे. स्वाभिमान आणि गरजांवर नियंत्रण ठेवत त्यांनी आपला हव्यास दूर ठेवून, एका परीने मानवी जीवनात येणारे दुःख कोसो दूर ठेवले आहे. ते सुखी आहेत. त्यांनी समाधानाच्या लक्ष्मण रेषा स्वतःभोवती आखून घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाबाबत नागरी लोकांना मोठे कुतूहल वाटते. नश्वर अशा मानवी जीवनाचा खरा अर्थ आणि सांप्रत जीवनाचा बोध पहिल्याप्रथम आदिवासींना झाला, असे म्हटल्यास आजिबात वावगे ठरणार नाही, याची शतप्रतिशत खात्री आहे. भगवतगीता देखील खऱ्या अर्थाने त्यांनाच प्रथम उमगली कारण ते नश्वर आणि अशाश्वत असे धनद्रव्य, सत्ता, संपती, अधर्माच्या व अनैतेच्या मार्गाने कधीच मिळवत नाहीत. या अर्थाने श्रीकृष्णाची भगवतगीता त्यांना चांगली समजली यास मोठा आधार सापडतो, तो त्यांच्या दररोजच्या जीवन जगण्याच्या जीवनशैलीतून. त्यांनी ती जीवनमूल्य अंगिकारली आहेत, कारण समाज एकसंघ ठेवणे, दुसऱ्याच्या दुःखात सहभाग घेणे, वाटून खाणे (सत्तेतील नव्हे, तर सत्मार्गाचे कष्ट करून मिळविलेले सांघिक फळ) भ्रष्टाचार न करणे, भीक न मागणे इ. असामान्य गुण त्यांच्यात विराजमान झालेले आहेत. मात्र नागरी जीवन जगणारे तथाकथित लोक त्यांना लंगोटे, मागासलेले म्हणतात आणि आता त्याच मागासलेपणाचे लेबल स्वतःला लावून घेण्यासाठी, सवलती मिळविण्यासाठी हे मागास नसलेले, सधन लोक अहोरात्र सरकार विरोधात लढत आहेत, हे २०२३ सालातील कटू वास्तव सत्य आहे. केव्हढा मोठा हा विरोधाभास...!
असो. कालाय तस्माय नमः

सौजन्य :- डॉ. श्री. गोपाल गवारी , लेखक , नाशिक 

Monday 6 May 2024

छत्रपती शाहू महाराज: महाराष्ट्राचे लोकराजा

 

Edit Image

छत्रपती शाहू महाराज: महाराष्ट्राचे लोकराजा

जन्म आणि पार्श्वभूमी:
  • जन्म: २६ जून १८७४, कागल, कोल्हापूर
  • मृत्यू: ६ मे १९२२, मुंबई
  • वंश: भोसले घराणे
  • राज्यारोहण: २ एप्रिल १८९४
कार्यकाल आणि सामाजिक सुधारणा:
  • शिक्षण: प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले, शिक्षणाचा प्रसार, अस्पृश्य मुलांसाठी वेगळ्या शाळा
  • समाजसुधारणा: जातिभेद आणि अस्पृश्यता निर्मूलन, मंदिरे खुली करणे, दलितांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण
  • महिलांचे हक्क: विधवा पुनर्विवाह कायदा, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन
  • शेती आणि उद्योग: शेतीत सुधारणा, सिंचन सुविधा, औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन
  • राज्यकारभार: प्रशासनात सुधारणा, कायदा आणि सुव्यवस्था, न्यायव्यवस्था सुधारणे
महत्त्व आणि वारसा:
  • महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीचे प्रणेते
  • अस्पृश्यता निर्मूलन आणि दलित हक्कांसाठी लढा
  • शिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी प्रयत्न
  • लोकशाही मूल्ये आणि शासन व्यवस्थेचा विकास
  • आजही प्रेरणादायी आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व
छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा महाराष्ट्रावर मोठा प्रभाव पडला. त्यांनी समाजात अनेक सुधारणा घडवून आणल्या आणि दलित, मागासवर्गीय आणि स्त्रियांसारख्या वंचित समुदायांसाठी न्याय मिळवण्यासाठी लढा दिला. आजही ते महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि आदरणीय नेते आहेत.
छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही खालील स्त्रोतांना भेट देऊ शकता:
  • विकिपीडिया: [अवैध URL काढून टाकली]्रपती_शाहू_महाराज
  • छत्रपती शाहू महाराज संग्रहालय, कोल्हापूर: [अवैध URL काढून टाकली]
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद: [अवैध URL काढून टाकली]
तुम्हाला छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल काय जाणून घ्यायचे आहे ते मला कळवा. मला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास आनंद होईल.
🚩६ मे इ.स.१६३६
शहाजहान व अदिलशहा यांच्यामध्ये १ महत्त्वाचा तह झाला, हा "तह" दक्षिणेतील राजकारणाला कलाटणी देणारा होता व यामध्ये २ "कलम" होते
एका कलमाप्रमाणे 'अदिलशहा हा 'शहाजहानचा' मांडलीक झाला.
दुसर्या कलमाप्रमाणे 'निजामशाही' संपवून ते राज्य 'मुघल' व 'अदिलशहा' यांनी वाटून घेण्याचे ठरले.
🚩६ मे इ.स १६५६
रायरी हा किल्ला जावळीच्या मोर्याकडुन शिवरायानी जिंकला आणि त्याचे रायगड असे नामकरण केले.
🚩६ मे इ.स.१६७५
शिवाजी महाराजांनी "फोंडा किल्ला" जिंकला.
🚩६ मे इ.स.१९२२
राजातील माणुस आणी माणसातील राजा लोकराजा "राजश्री छत्रपती शाहू महाराज" यांचे निधन झाले.
महाराजांनी बहूजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यास भर दिला, कोल्हापुर संस्थानात "प्राथमिक शिक्षण" सक्तीचे व मोफत केले, "स्त्री शिक्षणाचा" प्रसार व्हावा म्हणुन "राजज्ञा काढली व बहूजनंना "राजकिय निर्णय प्रक्रियेत" सामावुन घेण्यासाठी 'डेक्कन रयत असोशियन' संस्था स्थापन केली.
इ.स.१९१७ मध्ये विधवांसाठी 'पुर्नविवाहाचा' कायदेशीर मान्यता मिळवून दिली. अशाप्रकारे "शाहूंनी" समाजात महत्वाचे अनेक बदल घडवून आणले.
≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा
                      महाराष्ट्र राज्य
--------------☆★۩۞۩★☆--------------
   जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
                       जय गडकोट
                   !! हर हर महादेव !!

Saturday 27 April 2024

नवीन प्रवेश

 नवीन प्रवेश ।। नवीन प्रवेश ।।

के आर टी हायस्कूल वणी या विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीच्या नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देणे चालू आहे,

 इयत्ता पाचवी ते दहावी सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाला प्रवेश देणे सुरू आहे

शाळेच्या अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा.



https://youtu.be/qrAQu6Mr9QA


Monday 15 April 2024

Pat Exam

 Pat Exam चे मार्क खालील फॉरमॅटमध्ये आपण भरू शकता.





Monday 18 March 2024

सूर्यग्रहण

 




सूर्यग्रहण म्हणजे जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये येतो, तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहणाबद्दल खूप पूर्वीपासून नोंदी ठेवलेल्या आहेत.

सूर्यग्रहण हे अमावस्येच्या दिवशीच दिसते. पण सर्व अमावस्यांना सूर्यग्रहण दिसत नाही. कारण सर्व अमावस्यांना पृथ्वीची कक्षा आणि चंद्राची कक्षा एका रेषेत येत नाहीत. पण जेव्हा अमावस्येकडे पृथ्वीची कक्षा आणि चंद्राची कक्षा एका रेषेत येतात तेव्हाच सूर्यग्रहण होते.

   सूर्यग्रहणाचे प्रकार (Types of Solar Eclipse):-

सूर्यग्रहणाचे तीन मुख्य प्रकार आहेत:-

  • खग्रास सूर्यग्रहण (Total Solar Eclipse): जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपतो तेव्हा खग्रास सूर्यग्रहण होते.
  • खंडग्रास सूर्यग्रहण (Partial Solar Eclipse): जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या पाठीमागे जातो तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण दिसते.
  • कंकणाकृती सूर्यग्रहण (Annular Solar Eclipse): जेव्हा चंद्र पृथ्वीपासून सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. अशाप्रकारे चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही त्यामुळे सूर्याच्या बाह्य किरणाची अंगठी दिसते.

  सूर्यग्रहण पाहताना काय घ्यावी काळजी (Safety Precautions)-

सूर्यग्रहण हा उघड्या म्हणजेच साध्या डोळांनी पाहणे खूप धोकादायक आहे. त्यामुळे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सूर्यग्रहण पाहण्यासाठी खास तयार केलेले फिल्टर असलेले चष्मे (eclipse glasses) वापरावेत. एवढेच नाही तर वेल्डिंग शेड नंबर 14 चे ग्लासेस (welding shade 14 glasses) देखील सूर्यग्रहण पाहण्यासाठी वापरता येतात.

Friday 15 March 2024

जागतिक ग्राहक हक्क दिन

 जागतिक ग्राहक हक्क दिन दरवर्षी १५ मार्च रोजी साजरा केला जातो.



हा दिवस ग्राहक हक्क आणि गरजांबद्दल जागतिक जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे. सर्व ग्राहकांच्या हक्कांचा आदर आणि संरक्षण केले जावे, अशी मागणी करण्याची आणि बाजारपेठेतील अन्यायकारक प्रथांच्या विरोधात लढण्याची ही संधी आहे.


जागतिक ग्राहक हक्क दिन 2024 ची थीम "ग्राहकांसाठी योग्य आणि जबाबदार AI" आहे. ही थीम आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे आपल्या जीवनातील वाढते महत्त्व आणि AI चा विकास आणि वापर ग्राहकांसाठी योग्य आणि फायदेशीर असेल याची खात्री करण्याची गरज यावर प्रकाश टाकते.


जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त प्रोत्साहन दिलेले काही प्रमुख ग्राहक हक्क येथे आहेत:


* सुरक्षेचा अधिकार: ग्राहकांना त्यांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी हानिकारक उत्पादने आणि सेवांपासून संरक्षित करण्याचा अधिकार आहे.

* निवडण्याचा अधिकार: ग्राहकांना स्पर्धात्मक किमतींमध्ये विविध उत्पादने आणि सेवांमधून निवड करण्याचा अधिकार आहे.

* माहिती मिळण्याचा अधिकार: ग्राहकांना त्यांनी खरेदी केलेली उत्पादने आणि सेवांबद्दल अचूक आणि स्पष्ट माहिती मिळवण्याचा अधिकार आहे.

* ऐकण्याचा अधिकार: ग्राहकांना अयोग्य किंवा दिशाभूल करणाऱ्या पद्धतींबद्दल तक्रार करण्याचा आणि त्यांच्या तक्रारींचे न्याय्यपणे निराकरण करण्याचा अधिकार आहे.

* निवारण करण्याचा अधिकार: ग्राहकांना सदोष उत्पादने किंवा सेवांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मागण्याचा अधिकार आहे.


जागतिक ग्राहक हक्क दिन हा ग्राहकांच्या हक्कांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि निष्पक्ष आणि जबाबदार व्यवसाय पद्धतींना चालना देण्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे.

Thursday 29 February 2024

वणी केंद्राची एसएससी परीक्षा मार्च २०२४ ची आसनव्यावस्था जाहीर

 

के. आर. टी वणी, केंद्र क्रमांक ११७० साठी एसएससी परीक्षा २०२४ची आसन व्यवस्था जाहीर

केंद्र क्रमांक ११७०, के. आर. टी वणी साठी एसएससी परीक्षा २०२४ची आसन व्यवस्था आज जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाऊन आपला आसन क्रमांक पाहू शकतात.

केंद्र संचालक श्री शिंदे बी. व्ही. यांनी यावर्षीही एसएससी परीक्षा ही कॉपीमुक्त होणार आहे, असे सर्व पर्यवेक्षकीय सहविचार सभेत मार्गदर्शन करताना सांगितले. .

विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना:

  • विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळापत्रकानुसार वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र, ओळखपत्र आणि आवश्यक लेखन साहित्य सोबत आणणे आवश्यक आहे. 
  • परीक्षा केंद्रात गैरवर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल..

!! एसएससी परीक्षा २०२४ साठी शुभेच्छा !!









Thursday 22 February 2024

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा

"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या उपक्रमांतर्गत शासकीय तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या अनेक शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे।  राज्यातील जवळपास एक लाखाच्या वरती शाळांनी आपला सहभाग नोंदविला असून, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपांतर्गत माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या संदेश पत्रामध्ये  माननीय मुख्यमंत्री साहेबांनी बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकण्याचा व सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार, चांगल्या प्रतीचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे असा या उपक्रमाचा उद्देश आहे. 

मा. मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक विद्यार्थी यांचा सेल्फी
यासाठी खालील लिंकला क्लिक करा. 


Saturday 17 February 2024

महावाचन उत्सव -2024

 महावाचन उत्सव उपक्रमामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांतून आपल्याला मिळालेली प्रेरणा किंवा शिकवण नेहमीच प्रेरणादायी ठरत असते.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील असेच काही महत्त्वाच्या प्रसंगांवर या ठिकाणी एक प्रश्नावली तयार करण्यात आलेली आहे. आपण ही प्रश्नावली सोडविण्याचा प्रयत्न करूया. 

प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिलेले आहेत . यातील योग्य तो पर्याय निवडणे. जर आपल्याला 60%  च्या पुढे गुण मिळाले, तर तुम्हाला एक छानसे प्रमाणपत्र तुमच्या E- MAIL वर मिळेल. तुम्ही ते प्रिंट करून घेवू शकता. दररोज फक्त 60 प्रमाणपत्रे वाटप केली जातील. पुढील प्रमाणपत्रे दुसऱ्या दिवशी आपल्या E-MAIL वर पाठवली जातील. 

आपण ही प्रश्नावली कितीही वेळा सोडवू शकता.

खालील लिंकला क्लिक करून आपण ही प्रश्नावली सोडवू या. 



येथे क्लिक करा.


Thursday 15 February 2024

हनुमान जन्मस्थान संस्था, अंजनेरी ||


मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरीष्ठम् वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये ।। प्रभूश्रीरामचंद्रांचे-रामललांचे अयोध्येतील भव्य मंदिर होणे ही केवळ देशपातळीवरील नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक महान, दिव्य घटना आहे. श्रीराम म्हटल्यावर हात भक्तीभावाने जोडले जातात अन् लगेच श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये असे म्हणून त्याच भक्तीभावाने पुन्हा हात जोडले जातात. श्रीरामभक्त श्रीहनुमंतांचे असेच भव्य मंदिर त्यांच्या जन्मस्थळी अंजनेरी येथे व्हावे ही सर्व हनुमानभक्तांची तीव्र इच्छा आहे, अन् त्यासाठी नाशिक परिसरातीलच नव्हे तर सर्वदूरच्या हनुमान भक्तांनी हे भव्य मंदिर स्थापित करण्याचे ठरविले आहे.
 नाशिक हे केवळ धार्मिक क्षेत्र नव्हे तर एक आकर्षक पर्यटनकेंद्र झाले आहेच. या भव्य दिव्य श्रीहनुमान मंदिरामुळे पर्यटनकेंद्र म्हणून नाशिकचा लौकिक वाढणार आहे व या पर्यटनातून परिसराचा विकास होणार आहे. हनुमान जन्मस्थान जनजागृती उपक्रम आहे.

खालील लिंकला क्लिक करून आपण आपली प्रतिक्रिया नोंदवू शकता.



Thursday 18 January 2024

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा

 मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा 

याचे forms आपण खालीलप्रमाणे  Download करून पाहू शकता .  आवश्यक ती माहिती अगोदर तयार करून नंतर   2 MB  पर्यंत आपले फोटो  ( २ किंवा ३ ) PDF स्वरुपात तयार करून नंतर  Upload  करावे.  केलेली माहिती आपण सेव Save करून ठेवा .  याप्रमाणे  आपण आपला  मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम  पूर्ण करून नंतर तो  Finalise करावा.


                 

           Download Forms



Sunday 14 January 2024

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा

 माझी शाळा सुंदर शाळा चे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणेबाबत...


    सुंदर शाळा हा उपक्रम दिनांक 1 जानेवारी 2024 पासून ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत 45 दिवस हा उपक्रम राबवला जाणार आहे या अंतर्गत या शाळांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन education .maharashtra.gov.in या वर जावून स्कूल पोर्टल मधून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यावर जाऊन शाळेचे रजिस्ट्रेशन  सर्व शाळांनी करावयाचे आहे. यासंदर्भात सोबत व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ बघून त्यानुसार आपल्या शाळेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावयाचा आहे. तसेच हे रजिस्ट्रेशन करताना  एक जानेवारीपासून तर आज पावतो आपण जे उपक्रम राबविले आहेत त्या उपक्रमांची   मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या मध्ये आपण राबवलेल्या उपक्रमांची माहिती नोंदवायची आहे व पीडीएफ स्वरूपात फोटो अपलोड करावयाचे आहेत तरी सर्व शाळांनी याबाबत कार्यवाही करावी परंतु हा 45 दिवसाचा उपक्रम असल्यामुळे फायनल सबमिट करू नये. 45 दिवसाचे आपल्याला दर आठवड्याला किंवा दररोज याची ऑनलाईन माहिती  भरावयाची आहे. व उपक्रम संपल्यानंतर फायनल सबमिट करावयाचे आहे. आपण जर आजच फायनल सबमिट केले, तर सदर याच्यावर आपल्याला माहिती भरता येणार नाही.

    तरी सर्वांनी याची काळजी घ्यावी आणि हा उपक्रम माननीय मुख्यमंत्री यांचा असल्याकारणाने याचा दर आठवड्याला आढावा घेतला जाणार आहे, त्यामुळे या उपक्रमाच्या संदर्भात जो शासन निर्णय आहे. त्या शासन निर्णयाप्रमाणे शाळा स्तरावर 45 दिवस उपक्रम राबवून ऑनलाइन त्याची दर आठवड्याला नोंदणी करावयाची आहे. आपण दर गुरुवारी आपल्याला अहवाल द्यायचा असल्याने आपण आठवडाभरातले सर्व उपक्रम गुरुवारपर्यंत नोंदवायचे आहेत, तर या सूचनेची सर्वांनी नोंद घ्यावी.

    या उपक्रमा संदर्भात विविध अधिकारीभेटी देऊन पाहणी होणार आहे तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांना याबाबत माहिती आहे का हे तपासणार आहेत.सर्व मुख्याध्यापक यांनी याबाबत च्या शासन निर्णयाचे प्रिंट काढून त्याचे शिक्षक सभा घेऊन वाचन करून घ्यावे व त्यावर सर्व शिक्षकांची स्वाक्षरी घ्यावी.

    तसेच  या उपक्रमात शाळांना रँकिंग देऊन शाळांना पारितोषिक देखील दिले जाणार आहे. तरी या उपक्रमाची अंमलबजावणी सर्वांनी नियमित करावी.  उद्यापासून शाळचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यास सुरुवात करावी .आपण रजिस्ट्रेशन केले की नाही हे BEO लॉगिन वर दिसणार आहे.

**********

खालील व्हिडिओ पाहून आपण शाळा रजिस्ट्रेशन करू शकता ..

https://youtu.be/OsP_Ja-HaOU?si=WkmxrnFwbUFscnWx

Monday 1 January 2024

शिक्षणाबद्दल संपूर्ण माहिती

   प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी आणि जीवनात यश मिळवण्यासाठी उत्तम शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच आपले व्यक्तिमत्व घडवण्यासही मदत होते. शालेय शिक्षण प्रत्येकाच्या जीवनात मोठी भूमिका बजावते. संपूर्ण शिक्षण प्रणाली प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण अशा तीन भागांमध्ये विभागली गेली आहे. शिक्षणाच्या सर्व स्तरांना स्वतःचे विशेष महत्त्व आणि स्थान आहे. आपल्या मुलांना यशाच्या दिशेने जाताना आपल्या सर्वांना पहायचे आहे, जे केवळ चांगल्या आणि योग्य शिक्षणानेच शक्य आहे.

शिक्षणाचे महत्त्व (Importance of education in Marathi)

आजच्या समाजात शिक्षणाचे महत्त्व खूप वाढले आहे. शिक्षणाचे उपयोग अनेक आहेत पण त्याला नवी दिशा देण्याची गरज आहे. शिक्षण असे असले पाहिजे की माणसाला त्याच्या वातावरणाची ओळख होईल. आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हे अत्यंत आवश्यक साधन आहे. शिक्षणाच्या या साधनाचा उपयोग करून आपण आपल्या जीवनात काहीही चांगले साध्य करू शकतो.

उच्च पातळीचे शिक्षण लोकांना सामाजिक आणि कौटुंबिक आदर आणि एक वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत करते. शिक्षणाचा काळ हा प्रत्येकासाठी सामाजिक आणि वैयक्तिकरित्या खूप महत्त्वाचा काळ असतो, यामुळेच आपल्या जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व आहे.