google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: शिक्षक बदल्यांच्या दुकानदारीला ब्रेक
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Tuesday 1 August 2017

शिक्षक बदल्यांच्या दुकानदारीला ब्रेक

शिक्षक बदल्यांच्या दुकानदारीला ब्रेक
========= =========
Maharashtra Times | Updated Aug 1, 2017, 03:22 AM IST
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत यंदा सर्व प्रकारच्या दुकानदाऱ्यांना ब्रेक लागणार आहे. राज्य सरकारच्या धोरणानुसार यंदा ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जाणार आहे. जिल्ह्यातील इच्छुकांना मंगळवारी एक ऑगस्ट दुपारी दोनपर्यंत अर्ज सादर करावा लागेल. सगळी प्रक्रिया मुंबईतून होणार असल्याने स्थानिक प्रशासन तणावमुक्त झाले आहे.
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत ग्रामविकास व शालेय शिक्षण खात्याने यंदा अवघड व सोपे क्षेत्र असे निकष लावले होते. त्यावर आक्षेप नोंदविले गेले. न्यायालयीन प्रक्रियेनंतर आता बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यासह राज्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागात जिल्हांतर्गत बदल्या करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईहून वेळापत्रक ठरवून दिले आहे. सरल पोर्टलमध्ये बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांना ऑनलाइन फॉर्म भरून द्यावा लागेल. विशेष शिक्षक संवर्ग यावेळी करण्यात आला असून, त्यात पती पत्नी एकत्रीकरण योजनेंतर्गत प्राधान्य दिले जाईल. शाळेपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत जर शिक्षकाचा जोडीदार कार्यरत असेल तर त्यांना प्राधान्य दिले जाईल. अवघड क्षेत्रात तीन वर्षे काम केलेले तसेच दहा वर्षे सोप्या क्षेत्रात कार्यरत असणारे आणि बदलीसाठी अर्ज केल्यानंतर सेवाज्येष्ठता यादीनुसार त्यांना प्राधान्यक्रम दिला जाईल.

ऑनलाइन सूची
बदलीप्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याने स्थानिक कार्यालयात कुठेच हालचालीला वाव राहणार नाही. दरम्यान झेडपी प्रशासनाने सेवाज्येष्ठता सूची ऑनलाइन प्रसिद्ध केली आहे. शिक्षकांना बदलीसाठी अर्ज करताना २० पर्याय द्यावे लागणार आहेत. यादी संकलित होऊन बदल्यांची यादी मुंबईहूनच प्रसिद्ध केली जाणार आहे.

No comments:

Post a Comment

If you have any doubts . please contact me.